ताज्या घडामोडी

भाजपाच्या राज्यात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा पुण्यतिथी दिनी अपमान,,, कॉग्रेस पर्यावरण प्रदेश प्रमुख समीर वर्तक यांच्या कडून दखल,,,

पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधित प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी

आज 30 जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी दिनी गांधीजींचा अपमान करणाऱ्या आस्थापनावर कारवाई करण्याची मागणी, कॉग्रेस पर्यावरण विभाग प्रदेश प्रमुख समिर वर्तक यांनी शासनाकडे केली आहे, सालाबादप्रमाणे या वर्षी देखिल श्री समीर सुभाष वर्तक आपले पदाधिकारी यांच्या सह, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी अर्नाळा येथील महात्मा गांधीजींच्या अस्थिकलश विसर्जन स्मारकाच्या ठिकाणी आले होते, पवित्र वैतरणा संगम अर्नाळा येथे दिनांक 8 फेब्रुवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या अस्थिकलशाचे विधीवत पूजन करून विसर्जन करण्यात आले आहे ,आणि त्यानंतर दिनांक 2 ऑक्टोंबर 1956 रोजी ” अर्नाळा गांधी स्मारक स्तंभ समितीच्या” माध्यमातून हे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाच्या ठिकाणी श्री वर्तक आले असताना, अर्नाळा ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी दिनानिमित्त, कोणतीही तयारी अथवा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना अभिवादन करण्यात आले नसल्याचे, श्री समिर वर्तक यांच्या निदर्शनास आले,

दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी साफसफाई, फुलांची सजावट आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची प्रतिमा ठेवून त्यांचे अभिवादन अशी काहीही तयारी नव्हती. अशा प्रकारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा हा अपमान अर्नाळा ग्रामपंचायत आणि प्रशासनाने केला असल्याचे समिर वर्तक यांनी म्हटले आहे.
श्री समीर सुभाष वर्तक यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन, त्यांनी तातडीने पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि वसई तालुक्याचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांना फोन करून संपर्क करत,झाल्या प्रकाराची माहिती देऊन , संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर ग्रामपंचायत अर्नाळा ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची तैलचित्र आणत, गांधीजींना अभिवादन करण्याची तयारी केली , या नंतर,समीर वर्तक आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फुले वाहून त्यांना आदरांजली वाहून अभिवादन केले. त्यानंतर स्मारकाचे ठिकाणी असलेल्या झाडांना समीर वर्तक यांनी पाणी देखील घातले. जी झाडे समीर वर्तक यांनीच वृक्षारोपणाच्या माध्यमातून लावलेली आहेत.
यावेळी समीर वर्तक यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस अम्मार पटेल आणि वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाप्रमुख डेरीक फ्रुटॅडो आणि मौलाना जिया उल हक हे उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.