अवकाळी पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांना पत्र,,

मागील तीन चार दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाने राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना मोठा फटाका बसला आहे.ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड,वाडा या परिसरात भात मळणीच काम सुरू असताना अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून गेला आहे,भात पिका बरोबर अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला तसचे ईतर उत्पन्न घेत असताना अवकाळी पडलेल्या पावसामुळे भाजीपाला तसचे ईतर पिके सडुन गेली असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत,
याच पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहून शासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी पत्र दिले आहे.