ताज्या घडामोडी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग प्रमुख समिर शुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभेला पर्यावरण विभाग पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती

कॉंग्रेस पक्षाचे नेते मा,राहुलजी गांधी* यांच्या *भारत जोडो न्याय यात्रेचा* रविवार दिनांक 17 मार्च 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), दादर मुंबई येथे संपूर्ण भारतातून आलेल्या *INDIA आघाडीच्या* सर्व नेत्यांच्या आणि लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात समारोप समारंभ संपन्न झाला.
सन्माननीय राहुलजी गांधी हेच आपल्या भारत देशाला , आपल्या संविधानाला आणि लोकशाही ला वाचवणारे एकमेव नेते आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आपले नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय *नानाभाऊ पटोलेसाहेब* यांच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते सन्माननीय *बाळासाहेब थोरातसाहेब* यांच्या मार्गदर्शनात ही यात्रा यशस्वीपणे राबविण्यात आली.

या भव्य जाहीर सभेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश प्रमुख *श्री समीर सुभाष वर्तक* संपूर्ण महाराष्ट्रातुन प्रदेश पदाधिकारी व जिल्हाप्रमुखांनी उपस्थिती लावली होती. तसेच नंदुरबार , धुळे, नाशिक त्यानंतर पालघर जिल्ह्यात मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाडा आणि शेवटी भिवंडी , ठाणे येथेही पर्यावरण विभागातील पदाधिकाऱ्यांनी विशेष उपस्थिती लावली होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.