बदलापुर!तात्यासाहेब सोनवणे यांना राज्य सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर!
( ०८ मार्च २०२४) *
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार”, ‘समाजमित्र तात्यासाहेब सोनवणे’, बदलापूर जि. ठाणे यांना जाहीर झाला असून मंगळवार दि. १२ मार्च २०२४ रोजी त्यांना मुंबई येथे समारंभपूर्व सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. गेली २९ वर्ष अविरतपणे साहित्य, लेखन करीत, असह्य रुग्ण, असह्य विद्यार्थांला वैद्यकीय व शैक्षणिक मदत करीत आहेत. जागल्या काव्यसंग्रह, वैद्यकीय मदत व माहितीचा आधार, पुस्तके प्रकाशित असून, शाळा उपेक्षेची कविता संग्रह व लढाई कोरोनाशी विशेषांक प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. मानवमुक्तीचे प्रणेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या पाऊलखुणांवरून त्यांचा प्रवास सुरू असून, रूग्णहक्क संघर्ष समिती, व जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स व सामाजिक संस्थेचे ठाणे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख म्हणून काम करीत आहेत. सामाजिक काम करताना जाती आणि ज्ञातीचा विचार न करता आदिवासी, वंचित बहुजन समाजातील असह्य वेदनादायी प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी शासन प्रशासकीय अधिका-याकडून सोडवत आसतात. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण”, तात्यासाहेब सोनवणे यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.