ठाणे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यापूर्वी तालुक्यातून जिल्ह्याला सादर होणाऱ्या शिक्षकांचे पुरस्कार प्रस्ताव त्यांच्या शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून निःपक्षपातीपणे योग्य निवड करावी_शिक्षक सेनेची मागणी.
शिक्षक सेना आंदोलनाच्या पावित्र्यात
ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यात दिला जाणारा ठाणे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार योग्य व्यक्तीला देण्याकरिता,वस्तूनिष्ठ मूल्यांकन होणे करिता आपण याकरिता निवडलेल्या निवड समितीच्या वतीने तालुका निहाय आलेले जेव्हढे जिल्हा पुरस्कार प्रस्ताव असतील त्या सादरकर्त्या शिक्षकांचे त्यांचे कार्यरत शाळेवरील विद्यार्थी हितार्थ कार्य तपासण्यात यावे.शाळेतील विद्यार्थी गुणवत्ता लक्षात घेण्यात यावी.शालेय अभिलेख,विद्यार्थी गुणवत्ता बाबत-स्काॅलर्सशिप परीक्षा,नवोदय परीक्षा, प्रज्ञा शोध परीक्षा इ.परीक्षेतील भरीव कामगिरी,
तसेच सेवाभावी संस्था,NGO, लोकवर्गणीतून शाळेसाठी मिळवलेली भरीव मदत,भौतिक सुविधांची उपलब्धता इ.कार्यकुशलतेचाही मूल्यांकनात समावेश करण्यात यावा.
शाळेतील कर्तव्यतत्परता तसेच शाळेतील नियमित हजेरी,अध्यापन सातत्य, शिक्षकांचे वर्तन,चारित्र्य इ.बाबतचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यात येऊन ठाणे जिल्हा पुरस्कार हा तालुका निहाय देतांना योग्य शिक्षकांची निवड करण्यात यावी.
पुरस्कार देतांना राजकीय दबाव, आर्थिक देवाणघेवाण, पदाधिकारी हस्तक्षेप,व्यक्तिनिष्ठता यांना तिलांजली देण्यात यावी.
जे शिक्षक विद्यार्थीहित सोडून अशैक्षणिक कामाला प्राधान्य देतात.वैयक्तिक कामाला प्राधान्य देतात,जे शिक्षक हातात कधीही खडू फळा घेऊन मनापासून शिकवित नाहीत.अशांना तर ठाणे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊच नये अशी मागणी शिक्षक सेनेच्या वतीने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
तरी संघटनेचे मत विचारात घेऊन तालुका निहाय वस्तूनिष्ठ मूल्यांकन करून ठाणे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार निवड करतांना कोणावरही अन्याय होऊ नये व चुकीच्या व्यक्तीला शिक्षकाला पुरस्कार देण्यात येऊ नये.
अयोग्य व्यक्तीची पुरस्कार्थी नामांकनात चुकीच्या पद्धतीने निवड झाल्यास शिक्षक सेना भर कार्यक्रमात निषेध नोंदविल.असा इशाराही शिक्षक सेनेच्या वतीने देण्यात आला आहे .