बदलापूर पश्चिम बाजारपेठेतील अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिस बंदोबस्त मिळाला नाही की मिळु दिला नाही, ?
लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना आंदोलनावर ठाम
बदलापूर !! कुळगाव बदलापुर पश्चिम बाजारपेठेत अनाधिकृत बांधलेले तळ मजला+ एक असे सुमारे ३२ गाळे नगरपालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता बांधण्यात आले आहेत, या बाबत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आक्षेप घेऊन या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची प्रतिक्रिया दिली आहे, परंतु या अनाधिकृत बांधकाम पालिका प्रशासनाने पाडु नये म्हणून मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होताना दिसत आहे,लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेने मात्र या बाबत आक्रमक भूमिका घेतली असून तातडीने अतिक्रमणाची कारवाई करण्याची मागणी पालिकेचे मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे यांच्याकडे केली आहे,लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करुन येत्या एक नोव्हेंबरपासून संघटनेच्या वतीने नगरपालिका कार्याला समोर संघटनेच्या वतीने बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली जाणार आहे,याच पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे यांनी आज दिनांक २८ आक्टोंबर २०२२ रोजी अतिक्रमण हटवण्यासाठी आदेश काढले होते, अतिक्रमण हटवण्यासाठी सर्व यंत्रणा पालिका प्रशासनाने सज्ज देखील ठेवली होती, परंतु ऐनवेळी पोलिस बंदोबस्त आला नसल्याने ही कारवाई स्थगित केली असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे, परंतु पोलिस बंदोबस्त आला नाही का येवू दिला नाही? असा प्रश्न लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री प्रदिप गोविंद रोकडे यांनी ऊपस्थित केला आहे,कारण शहरातील जवळपास सर्वच राजकीय शक्ती हे अतिक्रमण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, या मध्ये पोलिस प्रशासनाला देखील दबाव तंत्राचा वापर करून पोलिस बंदोबस्त नाकारण्यासाठी सांगितले आहे हे मात्र नक्की, परंतु अशा प्रकारे चुकीच्या कामाला राजकीय मंडळी पाठीशी घालत असतील तर ही बदलापुर शहरासाठी दुर्दैवाची बाब आहे,याच पार्श्वभूमीवर आज सकाळी लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, या वेळी अशा प्रकारच्या चुकीच्या कामांना कायम स्वरुपी आळा घालण्यासाठी येत्या एक नोव्हेंबरपासून तिव्र आंदोलन सुरू करण्याचा निर्णय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला असून,जो पर्यंत पालिका प्रशासन हे अनाधिकृत बांधकाम जमिनदोस्त करत नाही तो पर्यंत एक नोव्हेंबरपासून बेमुदत साखळी उपोषणाला बसणार असल्याचा निर्णय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे,