परभणी मध्ये आंतरजातीय विवाहाचा हट्ट धरणाऱ्या मुलीची कुटुंबा कडुनच गळा दाबून हत्या
परभणी जिल्ह्यातील न्हावा परिसरातील स्वत:च्या परिवारा कडुन मुलीची हत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे,
परभणी मधिल न्हावा येथे राहत असलेले बाळासाहेब भिमराव बाबर, यांच्या मुलीचे,गावातच राहत असलेल्या एका मुला बरोबर प्रेम संबंध असताना बाबर यांच्या मुलीने प्रेम असलेल्या या तरुणा बरोबरच लग्न करण्याचा हट्ट धरला होता,परंतु बाबर परिवारा कडून या लग्नाला पुर्णपणे विरोध होता,हे आंतरजातीय विवाह होऊ नये म्हणून बाबर कुटुंबा कडुन मुलीवर प्रचंड दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू होता परंतु मुलगी आपल्या निर्णयावर ठाम असल्याने दिनांक २१ एप्रिल रोजी रात्री मुलगी घरात झोपली असताना मुलिचे वडील बाळासाहेब भिमराव बाबर यांनी झोपेतच मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली, परिवारातील अन्य सदस्य देखील बाबर यांच्या ह्या कृत्यात सामिल होते, झालेल्या प्रकाराबद्दल कोणाला माहिती होऊ नये या साठी बाबर यांनी त्यांच्या भावकीतील काही निवडक नातेवाईक यांना बोलावून परस्पर मुलीचे प्रेत जाळुन टाकुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अंत्यविधी साठी ऊपस्थित सर्व नातेवाईकांना घडलेला प्रकार माहीत असताना देखील एकाही नातेवाईकाने ही गंभीर बाब पोलिसांना कळवली नाही,त्या नंतर सुमारे दहा बारा दिवसांनी या प्रकरणाला वाचा फुटली आणि पोलिसांनी अधिक तपास करुन मुलीचे वडील बाळासाहेब भिमराव बाबर, अच्युत दत्तराम बाबर,राजेभाऊ रखमाजी बाबर, अशोक रुस्तुमराव बाबर, गंगाधर योगाजी बाबर, गोपाळ अशोक बाबर, यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला,त्याच प्रमाणे अंत्यविधीसाठी ऊपस्थितीत असलेल्या ईतर नातेवाईक यांच्या विरोधात देखील अपराध्याला मदत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास उपविभागीय अधिकारी अधिकारी समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असुन तपासकामी न्याय वैद्यकीय शास्त्र विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच पालम पोलिस पथक कारवाई दरम्यान घटनास्थळी उपस्थित होते,