ताज्या घडामोडी

येत्या १५ ऑगस्ट पर्यंत ३० लाख तरुणांना रोजगार देण्याचे काम सुरू होईल _राहुल गांधी

देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा जोरदार संघर्ष या वेळी बघायला मिळत आहे, लोकसभा निवडणुकीचा निकाल हा ४ जुन रोजी जाहीर होणार आहे, या मुळे देशात कोणत्याही परिस्थितीत इंडिया आघाडीचेच सरकार येणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे, या मुळे राहुल गांधी यांनी १५ ऑगस्ट पर्यंत ३० लाख तरुणांसाठी सरकारी पदावरील रिक्त जागा भरुन रोजगार उपलब्ध होणार असल्याचे आश्वासन दिले आहे,
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटा प्रचार करत असुन त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी तरुणांना केल आहे, नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु हे आश्वासन खोटे ठरले आहे, नरेंद्र मोदी यांनी चुकीच्या पद्धतीने जिएसटी लावला, चुकीची नोटबंदी केली, मोदी सरकार आदानी सारख्या उद्योगपतींसाठी काम करत आहे, मात्र आम्ही भरती भरोसा स्किम आणली असून ४ जुनला इंडिया आघाडीच सरकार १५ ऑगस्ट पर्यंत ३० लाख तरुणांना रोजगार देण्याचे काम सुरू करेल असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.